कुछ ना कहो, कुछ भी ना कहो!!

कुछ ना कहो, कुछ भी ना कहो!!
Summary

आर. डी. बर्मन यांच्या निधनानंतर प्रदर्शित झालेल्या आणि इतिहास घडवणाऱ्या '१९४२ अ लव्ह स्टोरी`' या चित्रपटातल्या 'कुछ ना कहो` 'या गाण्याची पहिली चाल विधू विनोद चोप्रा यांना अजिबात आवडली नव्हती. त्यावरून त्यांनी आरडी यांच्या तोंडावर टीका केली होती. मात्र दुसरी चाल अशी होती की....''कमाल!!' काय होता या गाण्याचा नेमका किस्सा?

काही वेळा प्रतिभा आणि लोकप्रियता यांचं गणितच काही केल्या जमत नाही. अफाट प्रतिभेचे संगीतकार आरडी बर्मन यांचं शेवटच्या काळात असंच झालं होतं. काम मिळत नव्हतं, हाताला आधीइतकं यश मिळत नव्हतं. `लिबास`सारख्या चित्रपटातली गाणी चांगली असली, तरी चित्रपट चालत नव्हते. नासिर हुसेन यांच्या सगळ्या चित्रपटांना ज्या आरडींनी लोकप्रियतेच्या उंचीवर नेलं, अशा नासिर हुसेन यांच्या प्रॉडक्शनचा `कयामत से कयामत तक` हा चित्रपट नव्या पिढीकडे गेला होता.

सुभाष घई `रामलखन`चं संगीत त्यांच्याकडे सोपवणार अशी चर्चा होती, पण हा चित्रपट लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याकडे गेला होता. नवनवे संगीतकार आणि प्रवाह उदयाला येत होते. थोडक्यात सिंह म्हातारा झाला होता. गवत खायची वेळ येईल की काय अशी वेळ आली होती.... पण प्रतिभावंतांचे दरवाजे फार काळ बंद राहत नाहीत. संधी दार ठोठावतेच. दादांकडे अशी संधी आली. विधू विनोद चोप्रा यांच्या रूपानं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com