साक्षर की सार्थक

साक्षर की सार्थक

शिक्षण हा विनोबा भावे यांचा जिव्हाळ्याचा विषय. शिक्षणाकडे आपला बघण्याचा सर्वसामान्य दृष्टिकोन व विनोबांचा दृष्टिकोन यात खूप तफावत आहे. शिक्षण म्हणजे माणूस घडविणे, आयुष्य सार्थक होणे ह्या शिक्षणाबाबतच्या रूढ कल्पना त्यांना साफ अमान्य आहेत. विनोबांच्या मते आपल्या आसपासच्या वस्तू पारखण्याची शक्ती म्हणजे विज्ञान आणि आत्मज्ञान, अध्यात्म.

शिक्षण दिले जात नाही, कारण ते देता येत नाही. शिक्षणाचे रूप हे अनिर्वचनीय आहे राज्यघटनेत जा १४ भाषांचा उल्लेख आहे त्या सर्व भाषांमध्ये 'शिकविणे' या क्रियेसाठी शब्दच नाही. शिकण्यासाठीच शब्द आहे. इंग्रजीमध्ये लर्न ( शिकणे ) हा शब्द आहे, टीच ( शिकविणे ) हाही शब्द आहे. म्हणजे शिकणे ही स्वतंत्र क्रिया मनाली आहेच, पण शिकविणेही स्वतंत्र क्रिया मानली आहे. मात्र आम्ही शिकण्याला मदत करू शकतो, शिकवू शकत नाही. ' तेजस्वि नावधीतमस्तु ' म्हणजे ' आम्हा दोघांचे अध्ययन तेजस्वी बनो ' , याचा अर्थ शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांबरोबर अध्ययन करीत आहेत, शिकत आहे.

अनेक शतकांपासून ज्यांच्या ज्ञानाचा, विचारांचा आदर्श समाजात आहे त्या लोकांचे लक्ष जीवन साक्षर कारण्यापेक्षा सार्थक करण्याकडेच जास्त होते. साक्षर जीवन निरर्थक असू शकते ह्याची उदाहरणे आजच्या सुशिक्षित समाजात सहज सापडणारी आहेत. याउलट निरक्षर जीवनही अत्यंत सार्थक असू शकते अशाविषयीचे अनेक दाखले इतिहासाने पहिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com