छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पेशव्यांपर्यंत मराठा राजवटीतील घटनांवर, आस्थाकेंद्रांवर आणि व्यक्तींवरही अनेकदा वाद विवाद होतात. वैचारिक किंवा राजकीय हेतूने केलेल्या या वादविवादांमुळे संपूर्ण महाराष्ट्र आंदोलीत होतो. अशा वेळी खरे ऐतिहासिक तथ्य पडताळण्यासाठी महाराष्ट्रात एकही विश्वासार्ह ठिकाण किंवा दस्ताऐवज मिळत नाही. मात्र पुण्यापासून दक्षिणेत १,२०० किलोमीटर अंतरावर, कावेरीच्या समृद्ध खोऱ्यात वसलेले तंजावर शहर मराठ्यांच्या इतिहासातील दस्ताऐवजांचा समृद्ध खजिनाच आपल्यासमोर खुले करते. चला तर मराठ्यांच्या दक्षिणेतील या राजधानीची शब्दभ्रमंती करूयात...