सध्याच्या जगात वावरताना इतिहास विसरून चालत नाही. त्यातही महाराष्ट्रात स्वातंत्र्याची ज्योत पेटवून 'हिंदवी स्वराज्य' स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्याला नेहमी प्रेरणा देतो. शिवरायांचा गौरवशाली इतिहास दाखविण्यासाठी अनेक मराठी चॅनेल्स पुढाकार घेत आहेत. काही वर्षांपूर्वी 'राजा शिवछत्रपती' ही मालिका सुरू होती. त्यानंतर 'स्वराज्यरक्षक संभाजी', 'जय भावानी जय शिवाजी' अन् आता सुरू असलेली 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिका खऱ्या अर्थाने इतिहासाची पाने उलगडत आहेत.
'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' ही मालिका सध्या एका मराठी चॅनलवर सुरू आहे. त्यामुळे ताराराणींचा इतिहास जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरपणे हत्या केली. त्यानंतर स्वराज्यावर चालून येणाऱ्या संकटांना दूर ठेवण्याचं काम ताराराणींनी केलं. त्यांनी मोगलांपासून जनतेचं संरक्षणचं केलं नाही, तर स्वराज्याचा बचावही केला, त्यांच्याविषयी जाणून घेऊयात...