किशोर पेटकरउपांत्यपूर्व फेरीपासून मुंबईने चिकाटीने खेळ खेळला. बडोद्याविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीवर आगेकूच राखल्यानंतर तमिळनाडूविरुद्ध मुंबईकरांनी डाव व ७० धावांनी विजय मिळवून रणजी करंडक जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकले. .भारतीय क्रिकेटमध्ये एक काळ होता, जेव्हा देशांतर्गत मैदानांवर मुंबईचे निर्विवाद अधिराज्य होते. कालांतराने देशातील क्रिकेटची व्याप्ती वाढली, आणि मुंबईचे क्रिकेटमधील वर्चस्व कमी होत गेले. मुंबईच्या रणजी क्रिकेट संघाने २०१५-१६मध्ये स्पर्धा ४१व्यांदा जिंकली होती. त्यानंतर २०१६-१७मध्ये मुंबईने पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली, पण पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघ त्यांना भारी ठरला. २०२१-२२मध्ये मध्य प्रदेशने मुंबईला पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्यापासून रोखले. मध्यंतरीच्या काळात विदर्भ व सौराष्ट्राने प्रत्येकी दोन वेळा रणजी करंडक जिंकला. काही वर्षांपूर्वी हे दोन्ही संघ रणजी क्रिकेट स्पर्धेत संघर्ष करताना दिसत होते, त्यांना प्लेट गटातही खेळावे लागले होते. पण आता विदर्भ, तसेच सौराष्ट्रामधील क्रिकेटने भरपूर प्रगती साधलेली आहे आणि त्यामुळेच त्यांना रणजी करंडकही जिंकणे शक्य झाले होते. मात्र आता २०२३-२४ मोसमात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने पुन्हा एकदा गतवैभवाला उजाळा देताना रणजी करंडक तब्बल आठ वर्षांनंतर ४२व्यांदा जिंकण्याचा पराक्रम साधला.भारताच्या कसोटी संघातील स्थान गमावलेल्या अजिंक्यला विशेष सूर गवसला नाही, तसेच तंदुरुस्तीनेही अधूनमधून दगा दिला. तरीही कर्णधार या नात्याने त्याने संघात प्रबळ आत्मविश्वास जागविला. वानखेडे स्टेडियमवरील अंतिम लढतीत मुंबईने १६९ धावांनी विजयाला गवसणी घातल्यामुळे विदर्भाला तिसऱ्यांदा रणजी करंडक जिंकणे शक्य झाले नाही. मात्र पहिल्या डावात अवघ्या १०५ धावांत गारद झालेल्या विदर्भाने दुसऱ्या डावात चिवटपणा दाखविला, त्यामुळे मुंबईकरांना जल्लोषासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागली. ‘एलिट ब’ गटात मुंबईने सातपैकी पाच सामने जिंकून वर्चस्व अधोरेखित केले. छत्तीसगडविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला, तरी पहिल्या डावातील आघाडी मुंबईला पुरेशी ठरली. स्पर्धेत त्यांना फक्त एकच पराभव पत्करावा लागला. चुरशीच्या लढतीत उत्तर प्रदेशने दोन विकेटने विजयश्री खेचून आणली. उपांत्यपूर्व फेरीपासून मुंबईने चिकाटीने खेळ खेळला. बडोद्याविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीवर आगेकूच राखल्यानंतर तमिळनाडूविरुद्ध मुंबईकरांनी डाव व ७० धावांनी विजय मिळवून रणजी करंडक जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकले. .जागतिक क्रिकेटचा विचार करता, देशांतर्गत पातळीवर ऑस्ट्रेलियातील शेफिल्ड शिल्ड स्पर्धा न्यू साऊथ वेल्स संघाने ४७ वेळा जिंकली आहे, तर ४२ वेळा रणजी करंडक जिंकणारा मुंबईचा संघ या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईच्या युवा क्रिकेटपटूंनी यंदा जिगरबाज खेळ केला. हाच उत्साह कायम राहिल्यास आगामी काही मोसमात मुंबईचा संघ रणजी स्पर्धेत दबदबा राखू शकतो.आजच्या घडीस भारताच्या कसोटी क्रिकेट संघात रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल व सर्फराज खान असे तिघे मुंबईकर आहेत. श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूरही कसोटी संघाचे सदस्य होते. एकंदरीत भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मुंबईची सत्ता जाणवू लागलीय.अष्टपैलू कामगिरी ठरली निर्णायकरणजी करंडक विजेतेपदाच्या वाटचालीत मुंबई संघातील अष्टपैलू खेळाडूंची कामगिरी निर्णायक ठरली. दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय कसोटी क्रिकेट संघात स्थान मिळालेल्या सर्फराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खानने मुंबई रणजी करंडक विजेतेपदात उल्लेखनीय योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताला यशस्वी ठरू दिले नाही, मात्र उपविजेत्या संघासाठी १९ वर्षीय मुशीर खानने बॉलर व बॅटर म्हणून उपयुक्त योगदान दिले. भारतात परतल्यानंतर मुशीर लगेच मुंबईच्या रणजी संघात दाखल झाला. बाद फेरीतील सामन्यांत तो संघासाठी हुकमी एक्का ठरला. बडोद्याविरुद्ध द्विशतक, तमिळनाडूविरुद्ध अर्धशतक आणि अंतिम लढतीत विदर्भाविरुद्ध दुसऱ्या डावात शतक झळकावून मुशीरने भारतीय संघाचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. तीन सामन्यांत त्याने १०८.३च्या सरासरीने ४३३ धावा केल्या. शिवाय डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीने महत्त्वाच्या क्षणी गडी बाद करून कर्णधाराचा विश्वासही सार्थ ठरविला. .मुंबईच्या रणजी विजेतेपदाच्या वाटचालीत २५ वर्षीय ऑफस्पिनर तनुष कोटियन याचे योगदानही खूपच महत्त्वपूर्ण ठरले. त्याने १० सामन्यांत २९ गडी बाद केलेच, शिवाय १४ डावांत ५०२ धावा करून मुंबईचे शेपूट बळकट केले. तनुषने एक शतक व पाच वेळा अर्धशतके नोंदविली. तनुषमुळे संकटकाळात मुंबईला सावरणे शक्य झाले. त्याने दहाव्या क्रमांकावर, तर तुषार देशपांडेने अकराव्या क्रमांकावर खेळताना बडोद्याविरुद्ध उपांत्यपूर्व लढतीत शतके ठोकली. त्यांनी अखेरच्या विकेटसाठी केलेल्या २३२ धावांच्या भागीदारीमुळे बडोद्याला मुसंडी मारणे जमले नाही. डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलानी यानेही गरज असताना धावा केल्या. आक्रमक शैलीचा शिवम दुबे दुखापतीमुळे बाद फेरीतील सामन्यांना मुकला, मात्र साखळी फेरीत त्याने झंझावाती फलंदाजीचे प्रदर्शन घडविताना दोन शतके ठोकली. शिवाय १२ गडीही बाद केले. भारतीय संघातील पुनरागमनासाठी इच्छुक असलेल्या शार्दुलने रणजी स्पर्धेकडे मोर्चा वळविला. त्याचे अष्टपैलूत्व मुंबईसाठी साह्यकारी ठरले. संघ संकटात असताना त्याने उपांत्य लढतीत तमिळनाडूविरुद्ध नवव्या क्रमांकावरून शतक ठोकले. विदर्भाविरुद्ध पहिल्या डावातील त्याच्या ७५ धावा मौल्यवान ठरल्या. शार्दुलने पाच सामन्यांत २५५ धावा व १६ गडी बाद करून राष्ट्रीय निवड समितीला आपले विस्मरण होणार नाही, याची दक्षता घेतली. शार्दुल रणजी स्पर्धेला महत्त्व देत असताना श्रेयस अय्यरने कसोटी संघातील स्थान गमावल्यानंतर सुरुवातीला या प्रमुख स्पर्धेकडे पाठ फिरविली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) डोळे वटारताच तो मुंबईच्या रणजी संघात दाखल झाला, पण अतिशहाणपणामुळे बीसीसीआयच्या करारास मुकला. .वर्तमानातील अन्यायाला समर्थपणे तोंड देणारी आणि अन्याय करणाऱ्याला झुगारणारी ही महिला संत कोण?.बंगळूरच्या महिलांचा जल्लोषइंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकता, विराट कोहलीसारखा महान क्रिकेटपटू संघात असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला कधीच विजेतेपदाचा करंडक उंचावता आला नाही. तीन वेळा ते उपविजेते ठरले. पुरुष संघ यशाला गवसणी घालू शकला नाही, मात्र महिलांच्या प्रीमियर लीगमध्ये (डब्ल्यूपीएल) दुसऱ्याच प्रयत्नात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या महिलांनी विजयी पताका फडकावली. महिलांच्या प्रीमियर लीगला गतवर्षी सुरुवात झाली, यंदा दुसरे वर्ष. महिला क्रिकेटला व्यावसायिक व्यासपीठ मिळवून देण्याचा बीसीसीआयचा हा स्त्युत्य उपक्रम आहे. २०२३मध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने करंडक पटकावला. यावेळी प्ले-ऑफमध्ये बंगळूरच्या संघाने गतविजेत्यांचे आव्हान संपुष्टात आणले. अंतिम लढतीत दिल्ली कॅपिटल्सचे पारडे जड मानले जात होते, पण स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील बंगळूर संघाने कमाल केली. फिरकी गोलंदाजीतील स्पृहणीय कामगिरीच्या बळावर बंगळूर विजेतेपद मिळवताना दिल्लीचे स्वप्न पुन्हा एकदा भंग केले. त्यांनी सामना आठ विकेट राखून जिंकला. त्यामुळे लागोपाठ दोन वर्षे अंतिम फेरी गाठूनही दिल्ली संघाला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. बंगळूरच्या यशस्वी वाटचालीत स्मृतीचे कल्पक नेतृत्व खुलून दिसले. त्याचवेळी तिने आपल्या फलंदाजीकडेही दुर्लक्ष होऊ दिले नाही. तिने एकूण ३०० धावा केल्या. ऑस्ट्रेलियन एलिस पेरीने स्पर्धेत सर्वाधिक ३४७ धावा नोंदविल्या. एलिस व स्मृती यांच्या सातत्यामुळे बंगळूरची फलंदाजी मजबूत झाली. विजेत्या संघाच्या रिचा घोषची तडाखेबंद फलंदाजीही लक्षवेधक ठरली. बंगळूरच्या गोलंदाजीत २१ वर्षीय श्रेयांका पाटीलची ऑफस्पिन गोलंदाजी चर्चेत राहिली. बंगळूरच्या या मुलीने अंतिम लढतीत चार विकेट टिपल्या. ऑस्ट्रेलियन डावखुरी फिरकी गोलंदाज सोफी मॉलिनेक्सने तीन विकेट घेत दिल्लीचे कंबरडे मोडले होते. लेगस्पिनर आशा शोभनाने दोन गडी बाद करून सोफी व श्रेयांका या फिरकी गोलंदाजांना छान साथ दिली. संपूर्ण स्पर्धेत श्रेयांका, सोफी व आशा यांच्यामुळे बंगळूरची फिरकी गोलंदाजी वरचढ ठरली. श्रेयांकाने १३, तर आशा व सोफी यांनी प्रत्येकी १२ विकेट टिपल्या. जाणकारांच्या मते, युवा श्रेयांकाचे महिला क्रिकेटमधील भवितव्य उज्ज्वल आहे.---------------------.शृंगारगीत घन ओथंबून येती...! ना. धों. महानोर यांच्या या गीताची जादू आजही कायम .ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
किशोर पेटकरउपांत्यपूर्व फेरीपासून मुंबईने चिकाटीने खेळ खेळला. बडोद्याविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीवर आगेकूच राखल्यानंतर तमिळनाडूविरुद्ध मुंबईकरांनी डाव व ७० धावांनी विजय मिळवून रणजी करंडक जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकले. .भारतीय क्रिकेटमध्ये एक काळ होता, जेव्हा देशांतर्गत मैदानांवर मुंबईचे निर्विवाद अधिराज्य होते. कालांतराने देशातील क्रिकेटची व्याप्ती वाढली, आणि मुंबईचे क्रिकेटमधील वर्चस्व कमी होत गेले. मुंबईच्या रणजी क्रिकेट संघाने २०१५-१६मध्ये स्पर्धा ४१व्यांदा जिंकली होती. त्यानंतर २०१६-१७मध्ये मुंबईने पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली, पण पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघ त्यांना भारी ठरला. २०२१-२२मध्ये मध्य प्रदेशने मुंबईला पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्यापासून रोखले. मध्यंतरीच्या काळात विदर्भ व सौराष्ट्राने प्रत्येकी दोन वेळा रणजी करंडक जिंकला. काही वर्षांपूर्वी हे दोन्ही संघ रणजी क्रिकेट स्पर्धेत संघर्ष करताना दिसत होते, त्यांना प्लेट गटातही खेळावे लागले होते. पण आता विदर्भ, तसेच सौराष्ट्रामधील क्रिकेटने भरपूर प्रगती साधलेली आहे आणि त्यामुळेच त्यांना रणजी करंडकही जिंकणे शक्य झाले होते. मात्र आता २०२३-२४ मोसमात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने पुन्हा एकदा गतवैभवाला उजाळा देताना रणजी करंडक तब्बल आठ वर्षांनंतर ४२व्यांदा जिंकण्याचा पराक्रम साधला.भारताच्या कसोटी संघातील स्थान गमावलेल्या अजिंक्यला विशेष सूर गवसला नाही, तसेच तंदुरुस्तीनेही अधूनमधून दगा दिला. तरीही कर्णधार या नात्याने त्याने संघात प्रबळ आत्मविश्वास जागविला. वानखेडे स्टेडियमवरील अंतिम लढतीत मुंबईने १६९ धावांनी विजयाला गवसणी घातल्यामुळे विदर्भाला तिसऱ्यांदा रणजी करंडक जिंकणे शक्य झाले नाही. मात्र पहिल्या डावात अवघ्या १०५ धावांत गारद झालेल्या विदर्भाने दुसऱ्या डावात चिवटपणा दाखविला, त्यामुळे मुंबईकरांना जल्लोषासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागली. ‘एलिट ब’ गटात मुंबईने सातपैकी पाच सामने जिंकून वर्चस्व अधोरेखित केले. छत्तीसगडविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला, तरी पहिल्या डावातील आघाडी मुंबईला पुरेशी ठरली. स्पर्धेत त्यांना फक्त एकच पराभव पत्करावा लागला. चुरशीच्या लढतीत उत्तर प्रदेशने दोन विकेटने विजयश्री खेचून आणली. उपांत्यपूर्व फेरीपासून मुंबईने चिकाटीने खेळ खेळला. बडोद्याविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीवर आगेकूच राखल्यानंतर तमिळनाडूविरुद्ध मुंबईकरांनी डाव व ७० धावांनी विजय मिळवून रणजी करंडक जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकले. .जागतिक क्रिकेटचा विचार करता, देशांतर्गत पातळीवर ऑस्ट्रेलियातील शेफिल्ड शिल्ड स्पर्धा न्यू साऊथ वेल्स संघाने ४७ वेळा जिंकली आहे, तर ४२ वेळा रणजी करंडक जिंकणारा मुंबईचा संघ या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईच्या युवा क्रिकेटपटूंनी यंदा जिगरबाज खेळ केला. हाच उत्साह कायम राहिल्यास आगामी काही मोसमात मुंबईचा संघ रणजी स्पर्धेत दबदबा राखू शकतो.आजच्या घडीस भारताच्या कसोटी क्रिकेट संघात रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल व सर्फराज खान असे तिघे मुंबईकर आहेत. श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूरही कसोटी संघाचे सदस्य होते. एकंदरीत भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मुंबईची सत्ता जाणवू लागलीय.अष्टपैलू कामगिरी ठरली निर्णायकरणजी करंडक विजेतेपदाच्या वाटचालीत मुंबई संघातील अष्टपैलू खेळाडूंची कामगिरी निर्णायक ठरली. दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय कसोटी क्रिकेट संघात स्थान मिळालेल्या सर्फराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खानने मुंबई रणजी करंडक विजेतेपदात उल्लेखनीय योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताला यशस्वी ठरू दिले नाही, मात्र उपविजेत्या संघासाठी १९ वर्षीय मुशीर खानने बॉलर व बॅटर म्हणून उपयुक्त योगदान दिले. भारतात परतल्यानंतर मुशीर लगेच मुंबईच्या रणजी संघात दाखल झाला. बाद फेरीतील सामन्यांत तो संघासाठी हुकमी एक्का ठरला. बडोद्याविरुद्ध द्विशतक, तमिळनाडूविरुद्ध अर्धशतक आणि अंतिम लढतीत विदर्भाविरुद्ध दुसऱ्या डावात शतक झळकावून मुशीरने भारतीय संघाचे दरवाजे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. तीन सामन्यांत त्याने १०८.३च्या सरासरीने ४३३ धावा केल्या. शिवाय डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीने महत्त्वाच्या क्षणी गडी बाद करून कर्णधाराचा विश्वासही सार्थ ठरविला. .मुंबईच्या रणजी विजेतेपदाच्या वाटचालीत २५ वर्षीय ऑफस्पिनर तनुष कोटियन याचे योगदानही खूपच महत्त्वपूर्ण ठरले. त्याने १० सामन्यांत २९ गडी बाद केलेच, शिवाय १४ डावांत ५०२ धावा करून मुंबईचे शेपूट बळकट केले. तनुषने एक शतक व पाच वेळा अर्धशतके नोंदविली. तनुषमुळे संकटकाळात मुंबईला सावरणे शक्य झाले. त्याने दहाव्या क्रमांकावर, तर तुषार देशपांडेने अकराव्या क्रमांकावर खेळताना बडोद्याविरुद्ध उपांत्यपूर्व लढतीत शतके ठोकली. त्यांनी अखेरच्या विकेटसाठी केलेल्या २३२ धावांच्या भागीदारीमुळे बडोद्याला मुसंडी मारणे जमले नाही. डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलानी यानेही गरज असताना धावा केल्या. आक्रमक शैलीचा शिवम दुबे दुखापतीमुळे बाद फेरीतील सामन्यांना मुकला, मात्र साखळी फेरीत त्याने झंझावाती फलंदाजीचे प्रदर्शन घडविताना दोन शतके ठोकली. शिवाय १२ गडीही बाद केले. भारतीय संघातील पुनरागमनासाठी इच्छुक असलेल्या शार्दुलने रणजी स्पर्धेकडे मोर्चा वळविला. त्याचे अष्टपैलूत्व मुंबईसाठी साह्यकारी ठरले. संघ संकटात असताना त्याने उपांत्य लढतीत तमिळनाडूविरुद्ध नवव्या क्रमांकावरून शतक ठोकले. विदर्भाविरुद्ध पहिल्या डावातील त्याच्या ७५ धावा मौल्यवान ठरल्या. शार्दुलने पाच सामन्यांत २५५ धावा व १६ गडी बाद करून राष्ट्रीय निवड समितीला आपले विस्मरण होणार नाही, याची दक्षता घेतली. शार्दुल रणजी स्पर्धेला महत्त्व देत असताना श्रेयस अय्यरने कसोटी संघातील स्थान गमावल्यानंतर सुरुवातीला या प्रमुख स्पर्धेकडे पाठ फिरविली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) डोळे वटारताच तो मुंबईच्या रणजी संघात दाखल झाला, पण अतिशहाणपणामुळे बीसीसीआयच्या करारास मुकला. .वर्तमानातील अन्यायाला समर्थपणे तोंड देणारी आणि अन्याय करणाऱ्याला झुगारणारी ही महिला संत कोण?.बंगळूरच्या महिलांचा जल्लोषइंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासावर नजर टाकता, विराट कोहलीसारखा महान क्रिकेटपटू संघात असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला कधीच विजेतेपदाचा करंडक उंचावता आला नाही. तीन वेळा ते उपविजेते ठरले. पुरुष संघ यशाला गवसणी घालू शकला नाही, मात्र महिलांच्या प्रीमियर लीगमध्ये (डब्ल्यूपीएल) दुसऱ्याच प्रयत्नात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या महिलांनी विजयी पताका फडकावली. महिलांच्या प्रीमियर लीगला गतवर्षी सुरुवात झाली, यंदा दुसरे वर्ष. महिला क्रिकेटला व्यावसायिक व्यासपीठ मिळवून देण्याचा बीसीसीआयचा हा स्त्युत्य उपक्रम आहे. २०२३मध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने करंडक पटकावला. यावेळी प्ले-ऑफमध्ये बंगळूरच्या संघाने गतविजेत्यांचे आव्हान संपुष्टात आणले. अंतिम लढतीत दिल्ली कॅपिटल्सचे पारडे जड मानले जात होते, पण स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील बंगळूर संघाने कमाल केली. फिरकी गोलंदाजीतील स्पृहणीय कामगिरीच्या बळावर बंगळूर विजेतेपद मिळवताना दिल्लीचे स्वप्न पुन्हा एकदा भंग केले. त्यांनी सामना आठ विकेट राखून जिंकला. त्यामुळे लागोपाठ दोन वर्षे अंतिम फेरी गाठूनही दिल्ली संघाला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. बंगळूरच्या यशस्वी वाटचालीत स्मृतीचे कल्पक नेतृत्व खुलून दिसले. त्याचवेळी तिने आपल्या फलंदाजीकडेही दुर्लक्ष होऊ दिले नाही. तिने एकूण ३०० धावा केल्या. ऑस्ट्रेलियन एलिस पेरीने स्पर्धेत सर्वाधिक ३४७ धावा नोंदविल्या. एलिस व स्मृती यांच्या सातत्यामुळे बंगळूरची फलंदाजी मजबूत झाली. विजेत्या संघाच्या रिचा घोषची तडाखेबंद फलंदाजीही लक्षवेधक ठरली. बंगळूरच्या गोलंदाजीत २१ वर्षीय श्रेयांका पाटीलची ऑफस्पिन गोलंदाजी चर्चेत राहिली. बंगळूरच्या या मुलीने अंतिम लढतीत चार विकेट टिपल्या. ऑस्ट्रेलियन डावखुरी फिरकी गोलंदाज सोफी मॉलिनेक्सने तीन विकेट घेत दिल्लीचे कंबरडे मोडले होते. लेगस्पिनर आशा शोभनाने दोन गडी बाद करून सोफी व श्रेयांका या फिरकी गोलंदाजांना छान साथ दिली. संपूर्ण स्पर्धेत श्रेयांका, सोफी व आशा यांच्यामुळे बंगळूरची फिरकी गोलंदाजी वरचढ ठरली. श्रेयांकाने १३, तर आशा व सोफी यांनी प्रत्येकी १२ विकेट टिपल्या. जाणकारांच्या मते, युवा श्रेयांकाचे महिला क्रिकेटमधील भवितव्य उज्ज्वल आहे.---------------------.शृंगारगीत घन ओथंबून येती...! ना. धों. महानोर यांच्या या गीताची जादू आजही कायम .ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.