केतकी जोशी
माणसाला एका क्षणात त्याच्या मूळ मातीशी जोडण्याची ताकद कशात असते? ती असते खाद्यान्नामध्ये. आपण कितीही मोठे झालो, प्रगती केली, तरी आपल्या मूळ चवींशी असलेलं आपलं नातं काही बदलत नाही. मग अगदी मुंबईसारख्या मेट्रो सिटीत तुम्ही राहात असलात तरीही... इथं नव्यानं लोकप्रिय होत असलेले फूड ट्रक्स मूळ चवीची आठवण करून देत आहेत!