Northeast India
Esakal
कॅप्टन निलेश गायकवाड
गुवाहाटी म्हणजे नॉर्थ ईस्टचं प्रवेशद्वार. सुरुवातीच्या काळात आसामची राजधानी म्हणून हे शहर प्रसिद्ध होतं, परंतु १९७२मध्ये गुवाहाटी प्रांतातलं दिसपूर हे ठिकाण आसामची राजधानी म्हणून घोषित करण्यात आलं. नरकासुरानं गुवाहाटी शहर वसवलं अशी एक आख्यायिका सांगितली जाते. प्राचीन काळात गुवाहाटीला प्रागज्योतिषपूर असंही म्हणायचे.
आपल्या देशाच्या ईशान्येला असणारी राज्यं सेव्हन सिस्टर्स म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या राज्यांच्या सौंदर्याविषयी, तिथल्या प्रेक्षणीय स्थळांविषयी आपण अनभिज्ञ असतो. मात्र तिथं भटकंती करायला गेल्यावर, तिथला इतिहास आणि संस्कृती जाणून घेतल्यावर अवाक व्हायला होतं! भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या काळात ईशान्येला फक्त तीनच राज्यं होती - आसाम, मणिपूर आणि त्रिपुरा. त्यानंतर बोलीभाषेच्या आधारावर चार नवी राज्यं तयार केली गेली.