संपादकीय
आपल्या सूर्यमालेच्या पलीकडे पसरलेल्या विश्वाच्या अथांग पसाऱ्यात आपल्यासारखे कोणी आहे का ते शोधण्याच्या आपल्या प्रयत्नांना अजूनही यश आलेले नाही. त्यामुळे मागच्या पिढीने आजच्या पिढीकडे मोठ्या विश्वासाने सोपवलेली ही पृथ्वी नावाची ठेव पुढच्या पिढीच्या हातात सोपविताना आजच्या पिढीला जबाबदारीनं वागावं लागेल हे पंचावन्नाव्या वसुंधरा दिनाने पुन्हा अधोरेखित केले आहे.