वयाच्या साठीनंतर तुम्हाला दिवाणावरून उठणंही अशक्य झालं तर त्या जगण्याला काही किंमत राहील का? त्यामुळे कितीही व्यग्र जीवनशैली असली तरी व्यायाम, शरीराची आवश्यक ती काळजी आणि सात्विक आहार याला पर्याय नाही हे आजच जाणा. कारण तुम्ही आज व्यायाम केलात, सात्विक आहार घेतलात तर त्याचा फायदा वयाच्या नव्वदाव्या वर्षापर्यंत होईल.