कविता मेहेंदळे
सुरेश आणि राघवेंद्र एकाच गल्लीत राहणारे घट्ट घट्ट मित्र! शाळेत जाताना एकत्र जायचे-यायचे. सुरेश ‘ब’ तुकडीत होता, तर राघवेंद्र ‘क’मध्ये. खरंतर ‘ड’ तुकडी मिळाली तरी चालेल पण आम्हाला एकत्र असू द्या; असं त्यांचं मागणं आजवरच्या शिक्षकांनी पाऽऽर फेटाळून लावलं होतं.
त्याला कारणही तसंच होतं. सुऱ्या आणि राघव दोघेही अगदी ढ म्हणून ओळखले जात नसले, तरी अभ्यासात सर्वसाधारणच होते.