आपण स्त्री आहोत म्हणजे आपण माणूस आहोत. माणसाला जगण्याचा जो निसर्गदत्त अधिकार आहे तो आपल्यालादेखील आहे, हे सिद्ध करण्याची धडपड म्हणजे मीराबाईंचा जीवनसंघर्ष.
राणा जी मोहे बदनामी लागे मिठी ।
कोई निंदों, कोई विंदो, मैं चलूंगी चाल अनुठी ।
महाराज! मला बदनामी मधुर वाटते. कोणी निंदा अथवा कोणी वंदा मी मात्र माझी चाल आगळी-वेगळी ठेवणार.