एरवी कुठलीही भाववाढ झाल्यावर निदर्शनं होतात, सोन्याची भाववाढ झाली तर मात्र लोक आनंद व्यक्त करतात. कारण त्यांनी वर्षानुवर्षं, अगदी चाळीस रुपये तोळ्यापासून सात हजार रुपये ग्रॅमपर्यंत, विविध भावांमध्ये सोनं घेतलेलं आहे. घरात अनेक ग्रॅम सोनं असल्यावर सोन्याची वाढणारी किंमत घरातील पुंजीचीही किंमत वाढवतच असते. त्यामुळेच जनतेच्या दृष्टीनं, गुंतवणूकदारांच्या दृष्टीनं सोन्याची किंमत वाढत राहणंच हिताचं आहे.