वसंत हा ऋतूंचा बादशहा. त्याचं आगमन झालं म्हणजे सृष्टीत चैतन्य निर्माण होतं. शिशिरामध्ये पानगळ झालेल्या वृक्षांना नवी पालवी फुटते. हिरवी, तांबूस, कोवळी पालवी वृक्षांच्या फांद्यांवर कुठून, कशी, कधी प्रकटते कळत नाही, पण त्या कोवळ्या पालवीमुळे देठ तुटण्याचं दु:ख झाडं विसरत असतील हे नक्की.