गाठीशी पुरेसा अनुभव नसतानाही भारतीयांनी साहेबांच्या संघाला चीतपट करून पाणी पाजले, चौपट लगान वसूल केला. इंग्लिश संघाला त्यांच्या बॅझबॉल तत्त्वज्ञानाचा भारी अभिमान होता, पण अखेरीस गर्वहरण झालेच. कसोटी क्रिकेट, विशेषतः भारतीय भूमीत, संयमानेच खेळायचे असते याची जाणीव एव्हाना इंग्लंडचे मार्गदर्शक ब्रेंडन मॅकलम यांना झाली असावी.