हा असा अठरापगड समाज इथं अस्तित्वात आलाच कसा? त्यांचा जनुकीय वारसाही असाच विविधतेनं नटलेला आहे की काय? त्यांचा उत्क्रांतीचा इतिहास काय सांगतो? याचं गूढ वैज्ञानिकांना खुणावत होतं.
त्याचाच धांडोळा घेण्याचा प्रयत्न आता केला गेला. त्यासाठी सतरा राज्यांमधल्या तब्बल २,७०० व्यक्तींच्या डीएनएची तपासणी केली गेली. त्यात निरनिराळ्या भौगोलिक प्रदेशांचं तसंच विविध भाषा बोलणाऱ्या व्यक्तींचं प्रतिनिधित्व असेल याची दक्षता घेतली गेली.