

निकिता कातकाडे
लग्न केलं नाही, तर फारसं काही बिघडत नाही. प्रत्येकानं लग्न केलंच पाहिजे असं नाही, लग्न न करता स्वतंत्र राहून स्वावलंबी आयुष्य जगण्याला प्राधान्य देऊ असं उत्तर देणारेही अनेकजण माझ्या पिढीमध्ये आहेत.
आता हेच विचार प्रत्येक तरुणाचे आहेत असंही नाही, कारण काही कोसांवर भाषा बदलते तसे आता काही कोसांवर तरुणाईचे विचार, प्राधान्यक्रम आणि अपेक्षा बदललेल्या असतात. माझ्या काही मित्रांना लव्ह मॅरेज करायचंय, काहींना अरेंज्ड आणि काहीजणांना लिव्ह-इनच्या पर्यायाचाही विचार करावासा वाटतोय!