आपण घेतलेला शेअर वर जात असतो तेव्हा आज विकू उद्या विकू करत विकणे होत नाही. तोच खाली यायला लागला तर पुन्हा वर जायची वाट पाहावीशी वाटते. म्हणजेच विकले पाहिजे हे कळते, पण ती वेळ केव्हा येते तेच कळत नाही.
एक मूलभूत सिद्धांत लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे शेअर आपण खरेदी करतो तोच पुढील भविष्यात विकण्यासाठी. मग ती वेळ येताच चालढकल कशाला?