

Psychology of Indian Cricket Fans
esakal
सुनंदन लेले - sdlele3@gmail.com
मान्य आहे की पूर्वीच्या तुलनेत सगळ्याच खेळांना जरा बरे दिवस आले आहेत. क्रिकेटचा तर सुवर्णकाळ सुरू आहे. भारत सरकारही खेळासाठी चांगल्या उपाययोजना करत आहे. तरीही भारतात क्रीडासंस्कृती रुजली आहे, असे म्हणता येणार नाही. भारतातील क्रिकेटचे वेड वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचले आहे. एका बाजूला भारतीय क्रिकेटपटू माध्यमांकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना इतकी प्रसिद्धी मिळते आहे की माध्यमे आणि चाहते यांना भारतीय क्रिकेटपटू गृहीत धरू लागले आहेत. न मागता मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे आणि चाहत्यांच्या वेडामुळे माध्यमांची किंवा चाहत्यांच्या प्रेमाची फारशी किंमत भारतीय क्रिकेटपटूंना राहिलेली नाही. दुसऱ्या बाजूला बाकीच्या खेळातील दर्जेदार खेळाडूंना ना माध्यमे योग्य प्रसिद्धी देत आहेत, ना चाहते साधे ओळखत आहेत. क्रिकेटची लोकप्रियता आकाशाला भिडली असली तरी भारतात क्रिकेटच्या खेळापेक्षा व्यक्तिपूजा जास्त होत आहे. पटत नाही ना, एक उदाहरण देतो.