ओंकार भिडे:
भारत वाहनांच्या वापराबाबत जगात पहिल्या तीन क्रमांकाचा देश आहे. गेल्या दहा वर्षांत देशातील पर्सनल मोबिलिटीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांची संख्या वेगाने वाढले आहे. आधी दुचाकींचे प्रमाण अधिक होते आणि आता कारची बाजारपेठ वाढत आहे. पर्सनल मोबिलिटी वाढल्याने जीवनात गतिमानता नक्कीच आली आहे; पण त्याबरोबर वाहन चालवितानाच्या दक्षतेबाबत भारताची प्रगती जगात उणे आहे. त्यामुळेच जगातील रस्ते अपघात भारतात सर्वाधिक आहेत.