सलील उरुणकर:
पुण्यातील एका ऑटोमोटिव्ह सायबर सिक्युरिटी स्टार्टअपने केलेल्या विश्लेषणानुसार, भारतातील रस्त्यांवर धावणाऱ्या एक कोटीहून अधिक वाहनांना सायबर हल्ल्याचा धोका संभवतो. वाहनांमध्ये असलेल्या शेकडो भागांना टार्गेट करून सायबर क्रिमिनल ते वाहन हॅक करू शकतात. याचा फटका ग्राहकांनाच नव्हे, तर वाहननिर्मिती कंपन्यांना बसत आहे.