पुणे : अंतिम वर्ष परीक्षांचे नियोजन करून वेळेत निकाल लावण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहून काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे १०० मनुष्यबळ उपस्थित राहणार असल्याने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे.
राज्य सरकारने कोरोनाच्या धोक्यामुळे विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी यांना घरातून काम करण्याची मुभा दिली होती. कडक लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कमी मनुष्यबळावर काम करण्यास सुरवात झाली, यासाठी रोटेशन पद्धत लावण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर महिन्यात पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे, गुणपत्रिका तयार करणे, निकाल घोषित करणे, फेरमूल्यांकन आदी कामाचा व्याप वाढणार आहे. त्यामुळे महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे १०० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेही यासंदर्भात आदेश काढले आहेत.
काळजी घ्यावी लागणार
पुणे विद्यापीठात ठराविक मनुष्यबळात काम सुरू झाल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली होती. आता १०० टक्के उपस्थितीमध्ये काम करावे लागणार आहे. महाविद्यालयांमध्येही प्राध्यापक, कर्मचारी यांची संख्या वाढल्यानंतर संसर्ग टाळण्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.