

Mumbai Pune Expressway Traffic Jam
esakal
पुणे : ‘हेच का तुमचं अत्यावश्यक व्यवस्थापन?’, ‘टोल कशासाठी घेतला जातो?’, ‘आमचे नुकसान होत असून, त्याला जबाबदार कोण ?’, ‘नुकसान भरपाई देणार का ?’, अशा तीव्र शब्दांत नागरिकांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण वाहतूक कोंडीमुळे फेसबुक, एक्स (ट्विटर) आणि इंस्टाग्रामवर वाहतूक कोंडीचे व्हिडीओ, छायाचित्रे आणि प्रवाशांचा संताप व्यक्त करणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत.