A New Hope for Life 50 Children in Conflict with Law Leave Crime
sakal
खडकवासला - गुन्हेगारीच्या वाटेवर भरकटलेल्या त्या ५० विधी संघर्षित बालकांच्या आयुष्यात आजच्या राखी पौर्णिमेच्या सकाळ सकारात्मक परिवर्तनाची नवी पहाट उगवली आहे. छत्रपती शिवराय आणि त्यांच्या शूरवीर मावळ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही ध्येय, शौर्य आणि जिद्दीच्या जोरावर स्वराज्य वाढविले. स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणाऱ्या या जाज्वल्य इतिहासातून बोध घेत आयुष्यात सकारात्मक बदल घडवून नव्या वाटेवर चालण्याची शपथ घेतली.