
पुणे : मुळशी धरणाबाबत टाटा समूह आणि राज्य सरकार यांच्यातील करार संपुष्टात येऊन दहा वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. तरी देखील या धरणाचा ताबा आजही टाटा समूहाकडे आहे. त्यामुळे या करारनामाच्या अटी व शर्ती तपासून टाटा समूहाकडून धरण ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करावी. तसेच या धरणातून 5 टीएमसी पाणी पुणे शहरासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
पुणे शहराची लोकसंख्या येत्या काही वर्षात पन्नास लाखापर्यंत जाणार असा पुणे महानगरपालिकेनेचा अंदाज आहे. एवढ्या लोकसंख्येसाठी पाण्याची उपलब्धता करणे अत्यावश्यक आहे.
पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि अपुरे पडणारे पाणी याचा विचार करता पुणे शहराला मुळशी धरणातून 5 टीएमसी पाणी उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. हे पाणी उपलब्ध झाल्यास खडकवासला, पानशेत, वरसगाव धरणाचा ताण कमी होणार आहे, असेही बागूल यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.