घोषणा दिली तर तिकीट देणार नाही : अजित पवार 

घोषणा दिली तर तिकीट देणार नाही : अजित पवार 

पिंपरी : "विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार हे निश्‍चित आहे. सध्याची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील राहिलेली नाही, ती बॅकफूटला आहे. पूर्वी बाळासाहेब ठाकरे "कमळाबाई'ला वाकवायचे आता उलटे सुरू आहे,'' अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केली. मेळाव्यात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी होती. त्यामुळे कार्यकर्ते घोषणा देत शक्तिप्रदर्शन करीत असताना अजित पवार यांनी "घोषणा दिली तर तिकीट देणार नाही', असे सांगितल्यावर सभागृहातील कार्यकर्त्यांनी घोषणा थांबवल्या.  

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्ता मेळावा झाला. त्या वेळी पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. त्या वेळी पवार बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, नगरसेवक दत्ता साने, शहराध्यक्ष संजोग वाघेरे आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, "पिंपरी, चिंचवड आणि भोसरी हे मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच आहेत. पक्षाकडून काही उमेदवार लवकर; तर काही काही उमेदवार भाजप-शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर जाहीर करण्यात येतील. आपल्याकडील अनेकांनी पक्षांतर केल्याने आता काट्याने काटा काढावा लागणार आहे, त्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवारी देताना जुन्या-नव्याचा समन्वय साधला जाईल. मात्र, नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तरुणांच्या हाती सत्ता द्यायची आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी वंचित आघाडीमुळे मतांचा फटका बसला, ते आता होऊ द्यायचे नाही.'' 

पवार म्हणाले, "सर्वत्र भाजपचे सरकार असताना विकास कुठेच होताना दिसत नाही. सध्या अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण सुरू आहे. मंदीमुळे अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अनेक उद्योगधंदे बंद होत आहेत. मात्र, यावर सरकार बोलायला तयार नाही. केवळ काश्‍मीरमध्ये 370 कलम रद्द केल्याचा गवगवा सरकार करीत आहे. फडणवीस सरकारने जनतेला फसवले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात जाहिराती सुरू आहेत, यासाठी पैसा कुठून आला?'' 

अजित पवार म्हणाले... 
- आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर सहा महिन्यांत शास्तीकर माफ करू 
- शहरात पोलिस आयुक्‍तालय झाले असताना गुन्हे कमी नाही झाले 
- पोलिस आयुक्‍तांच्या निवृत्तीला एक महिन्याचा अवधी असताना त्यांची बदली कशासाठी? 
- शेतकऱ्यांना हमीभाव दिला नाही 
- महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांचे मंदीबाबत मौन 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com