अमित शहा म्हणतात, भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये टेन्शन!

Amit Shah
Amit Shah

पुणे : देशातील प्रत्येक राज्यातील प्रादेशिक पक्षांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी 2014 मध्ये पराभूत केले आहे. त्यामुळे महाआघाडीतील कोणत्याही नेत्याने सभा घेतली तरी फरक पडणार नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांनी टेन्शन घेऊ नये, असा सल्ला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना दिला.

अमित शहा म्हणाले, की महाआघाडीत सहभागी झालेल्या नेत्यांच्या महाराष्ट्रात सभा घेऊन काही उपयोग नाही. उत्तर प्रदेशात कोणाला एकत्र यायचे त्यांना येऊ द्या. आमची तेथे 73 वरून 74 जागा होणार हे निश्चित आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये आपला पक्ष वाढत आहे. आतापर्यंत 80 पेक्षा अधिक भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. अयोध्येत त्याच जागेवर लवकर भव्य राम मंदिर होणारच, त्यासाठी भाजप कटीबद्ध आहे. आम्ही उत्तर प्रदेशात जिंकूच आणि ओरिसा व बंगालदेखील जिंकू!  भाजपला रोखण्यासाठी ममता दीदी आटापिटा करीत आहेत. पण आता ममता दिदींची सुटका नाही, बंगालमध्ये देखील आमचे सरकार येणार!

भाजपविरोधातील महाआघाडी महाराष्ट्रात चालणार नाही. अखिलेश, मायावती, ममता यांचा महाराष्ट्रात प्रभाव पाडूच शकणार नाहीत. मग कसली आघाडी? मोदींचा विकासाचा रथ कोणीच रोखणार नाही, असेही शहा यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com