Video : कृत्रिम बु्द्धिमतेचे कामगांरपुढे आव्हान

Artificial intelligence is challenge for workers.jpg
Artificial intelligence is challenge for workers.jpg

पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे येणाऱ्या तंत्रज्ञानामुळेे तांत्रिक कामांसाठी माणसाची गरज राहणार नाही. या काळात कामगारांचे काय, असा प्रश्न निर्माण होतील. तसेच पुढे काय करायचे हे आव्हान असेल. अशा स्थितीत मार्ग दाखविणारी वैचारिक भूमिका घेण्याची गरज लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले.

डिजिटल सातबारातून वीस कोटींचा महसूल 

भारतीय मजदूर संघाचे संस्थापक, विचारवंत दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी समारोहाचे उद्घाटन सातारा रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. उद्योजक बाबा कल्याणी, गोविंददेव गिरी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री विरजेश  उपाध्याय, रवींद्र वंजारवाडकर, अण्णा धुमाळ, प्रशांत साठे यावेळी उपस्थित होते.

डॉ. भटकर म्हणाले, "रोमन, ग्रीक यांसह अनेक संस्कृती जगात उदयास आल्या. कालौघात त्या वर गेल्या आणि लयासही गेल्या. पण भारतीय संस्कृती आजही जगात अक्षयपणे टिकून आहे. कारण या संस्कृतीला विचार आणि ज्ञानाचे अधिष्ठान मिळाले आहे. ते वेदांपासून मिळाले आहेच. पण ठेंगडींसारख्या विचारवंतांनीही हे अधिष्ठान संस्कृतीला मिळवून दिली. त्यांच्या विचारांचा अभ्यास केला पाहिजे."

मेट्रोच्या बांधकामावरील स्थगिती उठवली

बाबा कल्याणी म्हणाले, "नव्या औद्योगिक क्रांतीमुळे उद्योगात रोबोटिक्स आणि ऑटोमेशन होणार असले, तरी या क्रांतीमुळे भारत हा जगावर मात करू शकतो. कारण जगाला लागणारे तरुण मनुष्यबळ आणि बुद्धिमत्ता भारताकडेच आहे. त्यामुळे इंडस्ट्री 4.0 कडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. तसेच भारत सर्वांत मोठा उद्योग असलेला देश कसा होऊ शकतो, याचा विचार केला पाहिजे."

नगरला हुडहुडी; पुण्यात उष्मा

जोशी म्हणाले, "दत्तोपंत हे तपस्वी साधक होते. त्यांनी राष्ट्र प्रती निष्ठा आणि ध्येयाप्रती समर्पण केले. कर्मयोगीच होते. भारताच्या प्रगतीविषयक चिंतनासाठी त्यांनी आयुष्य दिले."

झेडपीमध्ये भाजपची वाट बिकट  

गोविंददेव गिरी महाराज यांनी दत्तोपंत ठेंगडी यांच्या भेटीचे अनेक अनुभव सांगितले. ते म्हणाले, " ज्ञान, भक्ती आणि कृती यांचा संगम म्हणजे दत्तोपंत. त्यांचे केवळ विचार समजून चालणार नाही, तर त्यांच्यासारखे विचार करण्याचे सामर्थ्य प्रत्येक कार्यकर्त्याला मिळवावे लागेल." 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com