Baramti : कर्नाटकने पाणी सोडल्याचा बाऊ करण्याची गरज नाही ; पवार

महाराष्ट्रानेही अनेकदा दूधगंगेच पाणी कर्नाटकात सोडलेले आहे

बारामती : कर्नाटकने महाराष्ट्रात जे पाणी सोडले त्यात वेगळ काही नाही, या पूर्वी आम्ही सरकारमध्ये असताना असे निर्णय घेतलेले होते, शेजारी राज्ये असतील तर अशा बाबी होतात, त्यात फार काही मोठ घडलय, अस मला वाटत नाही असे स्पष्ट मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.

बारामतीत माध्यमांशी बोलताना कर्नाटकने महाराष्ट्रात पाणी सोडल्याच्या मुद्यावर आज ते बोलत होत. महाराष्ट्रानेही अनेकदा दूधगंगेच पाणी कर्नाटकात सोडलेले आहे, शेजारी राज्ये एकमेकांना तशी मदत करत असतात, उजनीचे पाणी सोलापूरला सोडतो तेव्हा एका बाजूला महाराष्ट्र व दुसरीकडे कर्नाटक आहे, याला लगेचच वेगळे स्वरुप देण्याच काही कारण नाही.

समान नागरी कायद्याबाबत बोलताना ते म्हणाले, केंद्रात भाजपच सरकार आहे, राजनाथसिंहांनीही तसे सूतोवाच केलेले आहे, निवडून गेलेले आमदार बहुमताच्या जोरावर तसे निर्णय घेत असतात. यातही सूतोवाच करण वेगळ आणि अंमलबजावणी करण वेगळ...कदाचित त्यांचा असा प्रयत्न असेल, की असे विधान केल्यावर त्याची प्रतिक्रीया काय येते, ब-याचदा राज्यकर्ते प्रतिक्रीया आजमावण्यासाठी अशी विधान करतात, या मागेही तशी दाट शक्यता अजित पवार यांनी बोलून दाखवली.

ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी ठरवल तर महिला मुख्यमंत्रीही होऊ शकतात, कोणाच्या मनात काय याव हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, उध्दव ठाकरेंच्या मनात आल म्हणून त्यांनी महिला मुख्यमंत्रीपदाच वक्तव्य केल, कोणालाही मुख्यमंत्री करायच ठरल तर 145 चा आकडा ज्यांच्या मागे असतो ते काहीही करु शकतात, असे पवार म्हणाले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाबाबत बोलताना पवार म्हणाले, धादांत बिनबुडाचा आरोप आहे, पवारसाहेबांच नाव घेतल की ती बातमी होती, त्या मुळे राज ठाकरे यांनी अस वक्तव्य करतात हे दुर्देवी आहे, मुलाखतीच्या वेळेस ते काय बोलत होते हे आठवून बघा, माणसाने दुटप्पी वागू नये, पवारसाहेबांना महाराष्ट्र 55 वर्ष ओळखतो, सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचे काम केले, राज ठाकरेंनी हा आरोप करणे हास्यास्पद असल्याची टीका अजित पवार यांनी केली.

अँड. हरिश साळवे यांची नियुक्ती करा....

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी अँड. हरिश साळवे यांची नियुक्ती राज्य सरकारने तातडीने करावी, त्यांना या प्रकरणाचा अभ्यास आहे, कर्नाटकने ज्येष्ठ वकीलांची नियुक्ती केलेली असल्याने महाराष्ट्रानेहीतातडीने यात निर्णय घेत साळवे यांची नियुक्तीची गरज अजित पवार यांनी बोलून दाखवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com