
-सुवर्णा कांचन
उरुळी कांचन : बिवरी (ता. हवेली) ग्रामपंचायत प्रशासन आणि एका स्थानिक ग्रामस्थाविरुद्ध तीन स्थानिक ग्रामस्थांनी थेट पंचायत समितीकडे खोट्या तक्रारी दाखल केल्यानंतर स्थळ पाहणी न करताच गटविकास अधिकाऱ्यांनी देखील अधिकृत असलेले बांधकाम अनधिकृत ठरवत दोन वेळा पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सकाळ प्रतिनिधींनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतर ही माहिती हाती लागली आहे.