चास - चासकमान (ता. खेड) धरणातून सोडण्यात येत असलेले उन्हाळी आवर्तन सुरूच आहे. धरणात केवळ १० टक्के (०.७६ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. कालव्याद्वारे सुमारे ५६० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने पाणलोट क्षेत्रातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे.