पुणे : राम नदीच्या काठावर कचरा संकलनास नागरिकांचा विरोध

पर्यावरणालाच धोका निर्माण केल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतला
Citizens oppose garbage collection on banks of Ram river Pune Municipal Corporation
Citizens oppose garbage collection on banks of Ram river Pune Municipal Corporationsakal

पुणे : एकीकडे राम नदीच्या संवर्धनासाठी नागरिक, सामाजिक संघटना, पर्यावरण प्रेमी प्रयत्न करत असताना दुसरीकडे बावधन येथे पुणे महापालिकेने राम नदीच्या काठावर कचरा संकलन केंद्र उभारणीचे काम सुरू केले आहे. हा प्रस्ताव महापालिकेच्या मुख्यसभेत रद्द करण्यात आला होता. मात्र, महापालिकेवर प्रशासन आलेला असताना प्रशासनाने त्याची अंमलबजावणी करून पर्यावरणालाच धोका निर्माण केल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतला आहे. या ठिकाणचे कचरा संकलन केंद्र दुसरीकडे स्थलांतरित करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

कोथरूड कचरा डेपो येथे महापालिकेचा कचरा रॅम्प होता, पण ही जागा महामेट्रोला देण्यात आल्याने त्याठिकाणची पर्यायी जागा म्हणून बावधन खुर्द येथे सर्वे क्रमांक ६४ येथे राम नदीच्या काठावर कचरा संकलन केंद्र उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. याठिकाणी महामेट्रोकडून बांधकाम करून दिले जाणार आहे. नागरिकांच्या विरोधामुळे मुख्यसभेने २३ डिसेंबर २०२१ रोजी संकलन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला, पण सुमारे एक एकर जागेवर संकलन केंद्राचे काम सुरू केले आहे. लायन्स क्लब आॅफ पुणे इको फ्रेंडचे किशोर मोहोळकर, दगडू करंजावणे, अनिल चोंधे, आबा रावत यांनी यास विरोध केला आहे.

मोहोळकर म्हणाले, ‘‘राम नदीच्या संवर्धनासाठी महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च केले. अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत. पण याकडे दुर्लक्ष करत मुख्यसभेच्या ठरावाकडे दुर्लक्ष करत संकलन केंद्राचे काम सुरू केले आहे. त्यामुळे नदीला धोका निर्माण झाला आहे. या केंद्रातील विखुरलेला कचरा भविष्यात पाषाण तलावात जाण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात राम नदीला पूर आल्यानंतर हे पाणी या संकलन केंद्रात घुसण्याची शक्यता आहे. तसेच संकलन केंद्राचे काम सुरू झाले की रोज १००-२०० गाड्या येथून जाणार. त्यामुळे कचरा परिसरात विखरून दुर्गंधी सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने पर्यायी जागा शोधावी, अशी मागणी चोंधे व करंजावणे यांनी केली.

‘‘मुख्यसभेने रद्द केलेला ठराव विखंडणासाठी शासनाकडे पाठवला आहे, पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. या कोथरूड, वारजे परिसरातील सुमारे १५० टन कचरा येथे लहान वाहनातून येईल व मोठ्या वाहनात टाकून तो प्रकल्पांवर पाठवला जाणार आहे. याठिकाणी प्रक्रिया होणार नाही. हा प्रकल्प नदीपासून लांब आहे, पावसाच्या पाण्याचा व कचऱ्याच्या लिचेटची समस्या निर्माण होणार नाही.’’

-अजित देशमुख, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com