
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पुण्याची सार्वजनिक वाहतूक विस्कळित झाली होती. मात्र, बुधवारी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने रेल्वेसेवा नियमितपणे सुरू झाली. मात्र, ‘पीएमपी’च्या ८० बस ब्रेकडाउन झाल्याने दिवसभरात सुमारे २०० हून अधिक बसच्या फेऱ्या रद्द झाल्या, तर मुंबईहून पुण्याला येणाऱ्या शिवनेरी बसना सुमारे दीड ते दोन तास उशीर झाला.