ग्राहक तक्रार निवारण मंचाचा मोबाईल कंपन्यांना दणका

Reliance-Retail
Reliance-Retail

पुणे - टॅबमध्ये दोन वेगवेगळे सिमकार्ड टाकूनही ते कनेक्‍ट न झाल्यामुळे त्यांचे पैसे ग्राहकाला परत देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिला. 

सॅमसंग इंडिया इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रा. लि. आणि रिलायन्स रिटेल लिमिटेड यांना हा आदेश दिला आहे. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख आणि सदस्या शुभांगी दुनाखे यांनी हा निकाल दिला.

हरेश अर्जुन भगदे (रा. गणेश पेठ) यांनी याबाबत मंचाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांच्यातर्फे ॲड. मिलिंद महाजन यांनी मंचापुढे बाजू मांडली. भगदे यांनी रिलायन्स रिटेल लिमिटेड यांच्याकडून ‘सॅमसंग गॅलेक्‍सी टॅब ए थ्रीजी’ ऑगस्ट २०१५मध्ये १९ हजार ८८९ रुपयांना खरेदी केला होता. तक्रारदारांनी टॅबमध्ये सिमकार्ड टाकले, परंतु ते कनेक्‍ट झाले नाही, त्यामुळे त्यांनी सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधून टॅबमध्ये दोष असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी रिलायन्स रिटेल लिमिटेड यांच्याकडे टॅब बदलून मिळावा किंवा त्याची रक्कम परत मिळावी, अशी मागणी पत्राद्वारे केली. तक्रारदारांच्या सतत पाठपुराव्यानंतर टॅब विनामोबदला दुरुस्त करून देतील, असे त्यांना कळविण्यात आले.

मात्र, तो दुरुस्तच करून दिला नाही. विरुद्ध पक्षांनी सिमकार्ड कनेक्‍ट होत नसल्याची बाब अमान्य केली, तर संबंधित टॅब दुरुस्त केल्याचे विरुद्ध पक्षाने लेखी जबाबात मान्य केले. मात्र, टॅब कोणत्या कारणामुळे नादुरुस्त झाला होता, याचा खुलासा केलेला नाही, त्यामुळे 
विरुद्ध पक्षांनी तक्रारदाराला टॅबची किंमत खरेदीच्या तारखेपासून व्याजासह परत करावी. नुकसानभरपाई म्हणून २० हजार रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रुपये द्यावेत, असा आदेश मंचाने दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com