पुणे : संततधार पावसाने बळीराजा सुखावला 

पुणे : संततधार पावसाने बळीराजा सुखावला 

किरकटवाडी (पुणे) : मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. मात्र, कालपासून (सोमवार) संततधार पाऊस सुरू झाल्याने सिंहगड परिसरातील बळीराजा सुखावला आहे. काल रात्री दहा वाजल्यापासून खडकवासला, सिंहगड, पानशेत व आजूबाजूच्या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. 

पाऊस नसल्याने भात व कडधान्याची पिके करपायला लागली होती. पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत होतेच. शिवाय धरणांमध्ये पाणीसाठा खालावल्याने पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण होते की काय, असा प्रश्न पुणेकरांपुढे उभा ठाकला होता. मात्र, मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. सध्या पावसाचा जोर कमी असला, तरी पिकांसाठी हा पाऊस जीवदान देणारा ठरला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाऊस नसल्याने घेवडा, मूग, वाटाणा या कडधान्यांच्या पिकांची पाने पिवळी पडण्यास सुरुवात झाली होती. भातालाही लावणी केल्यानंतर पुरेसे पाणी न मिळाल्याने रोपे सुकायला लागली होती. उशिरा का होईना पण पाऊस आल्याने धीर आला आहे. आता रोगांचा प्रादुर्भाव न झाल्यास कडधान्याची पिके या पावसावरही येतील. 
- राहुल मुरलीधर मते, शेतकरी, खडकवासला

पिकांसाठी पावसाची अत्यंत आवश्यकता होती. शेतकऱ्यांनी पाऊस झाला म्हणून लगेच पिकांच्या वाढीसाठी युरियाचा अतिरिक्त वापर करू नये. युरियाऐवजी मिश्रखतांचा उपयोग करावा. पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसल्यास तत्काळ कृषी सहाय्यकांच्या सल्ल्याने योग्य औषध फवारणी करावी. खरीप हंगामासाठीचा पीक विमा उतरवण्याचे कामही 31 जुलैपर्यंत पूर्ण करून घेण्यात आलेले आहे.
- सत्यवान नऱ्हे, कृषी अधिकारी, हवेली तालुका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com