Pune Court : वडिलांना लाभला चार वर्षांनंतर मुलांचा सहवास; न्यायालयाच्या आदेशानंतर मिळाला ताबा

वडिल हे मुलांचे नैसर्गिक पालक आहेत. त्यामुळे मुलांना वडिलांचे प्रेम आणि आपुलकी मिळणे आवश्यक आहे.
Court
CourtSakal

पुणे - वडिल हे मुलांचे नैसर्गिक पालक आहेत. त्यामुळे मुलांना वडिलांचे प्रेम आणि आपुलकी मिळणे आवश्यक आहे, असे नमूद करीत दिवाणी न्यायालयाने एका वडिलांना त्यांच्या मुलांचा अंतरिम ताबा मंजूर केला. विशेष म्हणजे मुलांचा ताबा मिळालेले हे वडील चार वर्ष मुलांना भेटलेच नव्हते. न्यायालयाच्या या निकालामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला.

न्यायाधीश एस. आर. नरवडे यांनी हा निकाल दिला. उन्हाळ्याची सुटी असल्याने न्यायालयाने दोन्ही मुलांचा १८ दिवस अर्जदार वडिलांकडे ताबा दिला होता. हरभजन आणि हरप्रित असे या जोडप्याचे नाव आहे. त्यांची दोन्ही मुले सुखविंदर आणि हरविंदर (सर्व नावे बदललेली) यांचा ताबा मिळण्यासाठी वडील हरभजन यांनी ॲड. भरत मोरे आणि ॲड. प्राजक्ता मोरे यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला होता.

हरभजन हे कापड व्यवसायिक आहेत. तर हरप्रित या नोकरी करतात. त्यांचे २०१५ साली लग्न झाले होते. वैचारीक मतभेदातून वाद झाल्याने सध्या ते विभक्त राहत आहेत. हरप्रित यांनी त्यांच्या सासरच्यांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार आणि पोटगी व घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे. तेव्हापासून मुलांचा ताबा त्यांच्याकडे आहे. त्यामुळे मुलांची भेट व्हावी व त्यांचा काही दिवसांसाठी ताबा मिळण्यासाठी हरभजन यांनी दावा दाखल केला होता. त्यात दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकूण घेत न्यायालयाने १८ दिवसांसाठी मुलांचा ताबा वडिलांकडे सोपावला होता.

Court
Degree Exam : परीक्षा लांबल्यामुळे परदेशी जाणारे विद्यार्थी चिंतेत; प्रवेश रद्द होण्याची भिती

हे प्रकरण दावा दाखल असलेल्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. तसेच मुलांचा ताबा दिल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो, असा युक्तिवाद हरप्रित यांच्या वकिलांना केला होता. मात्र हे प्रकरण माझ्या अधिकार क्षेत्रात असून मुलांना कोणताही धोका नसल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.

न्यायालयाने निकालात नमूद केलेल्या बाबी -

- अर्जदार हे मुलांचे नैसर्गिक वडील आहेत

- मुलांना त्यांच्याविषयी प्रेम, स्नेह आणि ओढ आहे

- वडिलांकडे ताबा दिल्यास मुलांच्या जीवाला धोका नाही

- मुलांसाठी वडिलांचे प्रेम आणि आपुलकी आवश्यक आहे

Court
Teacher Agitation : पोलिसांच्या कारवाईमुळे शिक्षकांच्या आंदोलनात गोंधळ

नैसर्गिक पालक म्हणून वडिलांचा देखील त्यांच्या मुलांना भेटण्याचा व त्यांना घरी घेवून जाण्याचा अधिकार आहे. या प्रकरणातील वडील सुमारे चार वर्ष त्यांच्या मुलांना भेटले नव्हते. हीच बाब आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

- ॲड. भरत व प्राजक्ता मोरे, वडील हरभजन यांचे वकील

न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे मला मुलांसोबत वेळ घालवता आला. माझ्यासाठी हा मोठा आनंदाचा क्षण होता. मी माझ्या व्यवयाय बंद ठेवून मुंलासोबत राहिलो. त्यांचे देखील प्रेम मला अनुभवता आले. मुल पुन्हा परत जाताना अक्षरक्ष: रडत होती. भांडण ही आमची आहेत. त्यात मुलांचा काही दोष नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे दोघांकडे राहण्याचा अधिकार आहे, असे मला वाटते.

- वडील हरभजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com