उत्पादनवाढ, नोटाबंदीमुळे पिकांचे भाव मातीमोल!

नारायणगाव (ता. जुन्नर) - काढणी, मजुरी वसूल होत नसल्याने येथील संतोष तोडकरी या शेतकऱ्याने सोडून दिलेले फ्लॉवरचे पीक.
नारायणगाव (ता. जुन्नर) - काढणी, मजुरी वसूल होत नसल्याने येथील संतोष तोडकरी या शेतकऱ्याने सोडून दिलेले फ्लॉवरचे पीक.

नारायणगाव - मेथी, कोथिंबीर, वालवड, घेवडा या भाजीपाला पिकांसह बटाटा, आले, फ्लॉवर, टोमॅटो या भांडवली नगदी पिकांचे बाजारभाव मातीमोल झाल्याने शेतीधंदा म्हणजे आतबट्याचा खेळ झाला असल्याची भावना जुन्नर तालुक्‍यातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. उत्पादनात वाढ, नोटाबंदी आणि इतर कारणांमुळे हा परिणाम झाल्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात शेतमालाला अपेक्षित बाजारभाव मिळाला नसल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. शेतकऱ्यांकडून मातीमोल भावाने खरेदी केलेल्या भाजीपाल्याची विक्री व्यापारी ग्राहकांना तीन ते चार पट जास्त भावाने करत आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत असला; तरी किरकोळ व्यापारी मालामाल झाले आहेत.

मी कांदा, बटाटा व आले या पिकांची लागवड केली होती. बाजारभाव न मिळाल्याने गेल्या वर्षभरात पाच लाख रुपयांचा तोटा झाला आहे. 
- राजेंद्र वाजगे, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com