सायबर पोलिसांचा करिष्मा; ऑनलाईन फ्रॉड झालेल्या कॉसमॉस बँक आणि नागरिकांचे पैसे केले परत!

Online_Fraud
Online_Fraud

पुणे : सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून त्यांची ऑनलाईन माध्यमाद्वारे फसवणूक करीत कोट्यवधी रुपये लंपास केले. त्यापैकी सुमारे आठ कोटी रूपयांची रक्कम सायबर पोलिसांनी परत मिळवित नागरिकांना दिलासा द्यायचे काम केले आहे. मागील सहा महिन्यात इतकी मोठी रक्कम सायबर पोलिसांनी नागरिकांना परत करीत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला.

कधी बँकेतून बोलत असल्याचे सांगून तर कधी पेटीएम अद्ययावत करणे, विमा पॉलिसी नूतणीकरण, ओएलएक्सवरील खरेदी, बी-बियाणे, गूगल पे, महागडे तेल खरेदी-विक्री व्यवसाय अशा वेगवेगळ्या प्रकारची कारणे सांगत सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांपासून ते उच्चशिक्षित व्यक्ती, कंपन्या यांची आर्थिक व्यवहाराची गोपनीय माहिती घेऊन काही क्षणातच त्यांच्या बँक खात्यातील रक्कम लंपास करत असल्याच्या घटना सातत्याने घडतात. सायबर पोलिसांकडून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केला जातो. या प्रकरणात अनेक सायबर गुन्हेगारांना अटक ही केली जाते.

सायबर पोलिसांकडून नागरिकांचे गेलेले पैसे परत मिळवून देण्यास पोलिस प्राधान्य देतात. मागील सहा महिन्यात सायबर पोलिसांनी ७ कोटी ९२ लाख रुपये परत मिळवित ते ५५१ अर्जदारांना परत केले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक पाच कोटीची रक्कम कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणातील आहे. सायबर पोलिसांनी हाँगकाँगमधील हेनसेंग बँकेशी कायदेशीर प्रक्रिया करुन परत मिळविले आहेत.

सायबर गुन्हेगारानी पळविलेले पैसे असे मिळवितात सायबर पोलिस
कुठल्याही प्रकारची ऑनलाईन फसवणूक झाल्यास नागरिक सायबर पोलिसांकडे तत्काळ तक्रार अर्ज दाखल करतात. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन सायबर पोलिस बँकांना सांगून ज्या खात्यात पैसे पाठविण्यात आले आहेत. ते खाते गोठविले जाते. त्यानंतर बँकेशी पत्रव्यवहार करुन ते पैसे परत मिळविले जातात. त्यानंतर अनेक प्रकरणांतील नागरिकांचे पैसे त्यांना परत केले जातात.

अशी येते पोलिसांना अडचण 
नागरिक त्यांची फसवणूक झाल्यानंतर अनेक दिवस पोलिसांकडे येण्यास टाळाटाळ करतात. बराच उशीर झाल्यानंतर आणि पैसे मिळण्याची चिन्हे दिसेनाशी झाल्यानंतर ते पोलिसांकडे धाव घेतात. मात्र तोपर्यंत सायबर गुन्हेगार संबंधीत बँकेतुन पैसे काढून मोकळे झालेले असतात. त्यामुळे पोलिसांनाही पैसे मिळविण्यात अडचण येते. त्यामुळे नागरीकांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार करावी असे आवाहन आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"मार्च महिन्यात मी ऑनलाईन व्यवहार करताना कोणालाही ओटीपी दिलेला नसतानाही माझ्या बँक खात्यातील 20 हजार रुपयांची रक्कम गेली होती. त्यावेळी मी बँकेकडे तक्रार करतानाच सायबर पोलिसांनाही तक्रार अर्ज दिला होता. मागील महिन्यात मला माझे गेलेले पैसे परत मिळाले."
- दत्तात्रय कदम, नोकरदार.

"सायबर पोलिसांकडे तत्काळ तक्रार दाखल झाल्यानंतर त्याची गांभीर्यने दखल घेतली जाते.पहिल्यादा बँकांशी संपर्क साधून सायबर गुन्हेगाराने खाते गोठवून पैसे परत मिळविले जातात. त्यानंतर गुन्हेगारांचा शोध घेतला जातो. अशा पद्धतीने सहा महिन्यात 7 कोटी 92 लाख रुपये आम्ही परत मिळविले, तसेच संबंधीत तक्रारदारांना परत केले. त्यानंतर गुन्हेगारांचा शोध घेतला जातो."
- संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा.

महिना   परत केलेली रक्कम
जानेवारी 80 लाख 37 हजार 
फेब्रुवारी   5 कोटी 98 लाख 24 हजार
मार्च 27 लाख 25 हजार 
एप्रिल 50 लाख 52 हजार
मे 20 लाख 27 हजार
जून (26 पर्यंत) 11 लाख 72 हजार
एकूण 7 कोटी 88 लाख 39 हजार

 (Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com