प्लॅस्टिकमुक्तीसाठी सायकल रॅली

प्लॅस्टिकमुक्तीसाठी कन्याकुमारी ते मुंबई सायकल मोहीम करणारे तरुण (डावीकडून) अरुण आणि श्रीकांत बालसुब्रह्मण्यम.
प्लॅस्टिकमुक्तीसाठी कन्याकुमारी ते मुंबई सायकल मोहीम करणारे तरुण (डावीकडून) अरुण आणि श्रीकांत बालसुब्रह्मण्यम.

पुणे - प्लॅस्टिकच्या तोट्यांबाबत जनजागृती करण्यासाठी तमिळनाडूच्या श्रीकांत आणि अरुण सुब्रह्मण्यम उच्चशिक्षित भावंडांनी कन्याकुमारी ते मुंबई असा सायकल प्रवास सुरू केला. आज त्‍यांनी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया जवळ मोहिमेची सांगता केली.

श्रीकांत आणि अरुण हे दोघे भाऊ आहेत. त्यांनी आठ सप्टेंबरला कन्याकुमारी येथून सायकल प्रवासाला सुरवात केली. त्यानंतर तमिळनाडू, कर्नाटक राज्याचा प्रवास करत ते मंगळवारी महाराष्ट्रात दाखल झाले. पहिल्या टप्प्यात पुणे येथे आल्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ कार्यालयास भेट दिली. त्या वेळी त्यांनी ‘प्लॅस्टिकमुक्त भारत’ हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले. अरुण हा अभियंता असून, आयटी कंपनीत नोकरी करतो, तर श्रीकांत हा बी.टेकच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. आपल्याकडे प्लॅस्टिकचा अवास्तव वापर होतो आणि ते नष्ट करण्यासाठी विविध पर्याय असले, तरी ते प्रचलित नाहीत. त्यामुळेच जनजागृतीसाठी आम्ही या मोहिमेस सुरवात केली, असे अरुणने सांगितले. 

प्रवासाबाबत अरुण म्हणाला, ‘‘दोन हजार किलोमीटर सायकल  प्रवासात आम्ही विविध शाळा आणि महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक कसे नष्ट करता येईल आणि त्याचा वापर कसा टाळता येईल याबाबत माहिती दिली.’’ या दोन भावांमध्ये श्रीकांत हा सायकलपटू असून, राज्यस्तरावर चांगली कामगिरी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com