पुणे - पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्याने अक्षरशः तळ गाठला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उपलब्ध पाणीसाठ्याची अवस्था खूपच बिकट झाली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील २६पैकी एक धरण ठणठणीत कोरडे पडले असून, उजनीतील अचल पाणीसाठ्यानेही तळ गाठला आहे.
उजनीतील अचल पाणीसाठाही ४३ टक्क्यांनी कमी झाला आहे. आजघडीला जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून फक्त २७.८३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्ल्क राहिला आहे. एकूण पाणीसाठ्याचे हे प्रमाण अवघे १४.०३ टक्के इतके आहे.
सध्याचा उपलब्ध उपयुक्त पाणीसाठा हे गेल्या वर्षीच्या तुलनेत १८.७५ टीएमसी इतका कमी आहे. गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला ४६.५८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीच्या आजच्या तारखेच्या उपलब्ध उपयुक्त पाणीसाठ्याचे हे प्रमाण २३.४८ टक्के इतके होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा हा ९.४५ टक्क्यांनी कमी झाला आहे.
पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण कोरडे पडले असून, उजनीतील उपयुक्त पाणीसाठा उणे ४२.९८ टक्के इतका आहे. आतापर्यंत उजनी धरणातील अचल (मृतसाठा) साठ्यातील २३.०२ टीएमसी (४२.९८) टक्के पाणी वापरले आहे.
‘टाटां’च्या धरणांत १५.६५ टीएमसी पाणी
जिल्ह्यात टाटा उद्योग समूहाची सहा धरणे आहेत. त्यामध्ये मुळशी, ठोकळवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा आणि कुंडली यांचा समावेश आहे. या सहा धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ४२.७६ टीएमसी इतकी आहे. यापैकी सध्या १५.६५ टीएमसी (३६.६० टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.