केंद्राने मदत करावी हा शरद पवारांचा मुद्दा दुटप्पीपणाचा : देवेंद्र फडणवीस

केंद्राने मदत करावी हा शरद पवारांचा मुद्दा दुटप्पीपणाचा : देवेंद्र फडणवीस

कुरकुंभ : राज्यातील राजकीयदृष्टया वजनदार अशा पश्चिम महाराष्ट्रात आठ दिवस झाले अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त जनतेचे प्रशासनाकडून पंचनामे तसेच रस्ते, वीज, पिण्याच्या पाण्यासारख्या मुलभूत गरजा पूर्ण होऊ शकल्या नाहीत तर मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकणची काय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी अशी जहरी टीका उद्धव ठाकरे सरकारवर विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त गावांचा दौरा करताना बोलत होते. त्याच्या समवेत विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, माढयाचे खासदार रणजित नाईक निंबाळकर, आमदार राहुल कुल, जयकुमार गोरे, राम सातपुते, गोपीचंद पडळकर, माजी मंत्री बाळा भेगडे,  भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस पुढे म्हणाले, ''केंद्राने मदत केली पाहिजे हा शरद पवारांचा मुद्दा योग्य आहे. मात्र तो दुटप्पीपणाचा आहे. केंद्रातून मोदीजी मदत करतीलही मग राज्य सरकार काय करते हा प्रश्न पवार साहेबांनी राज्य सरकारला विचारावा. केंद्राची मदत मिळविण्यासाठी काय करावे लागते हे मुख्यमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री, आपत्कालीन समितीचे अध्यक्ष राहिलेल्या पवार साहेबांना चांगलंच माहीत आहे. ही मदत यायला काही कालावधी लागेल, तोपर्यंत मदतीची वाट नुकसानग्रस्त जनतेने पाहिला लावणे चुकीचे आहे. मशागती, जमिनी दुरूस्ती, नवीन लागवड यासाठी शेतकऱ्यांच्या खिशात पैसाच नाही. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने मदत दिली पाहिजे. त्यासाठी विरोधीपक्ष म्हणून आमचे प्रयत्न चालूच राहतील असे फडणवीस यांनी सांगितले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com