Cyrus Poonawalla: सायरस पूनावाला यांना ‘भारतरत्न’ सन्मान द्यावा ; शरद पवार, स्व. डॉ. मोहन धारिया पुरस्कार प्रदान

‘जगातील प्रत्येक पाचपैकी तिसरे लहान मूल सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेली प्रतिबंधात्मक लस घेत आहे. कोरोना उद्रेकाची तीव्रता त्यांच्या लस उत्पादनामुळेच कमी करता आली.
Pune
Pune sakal

पुणे : ‘‘जगातील प्रत्येक पाचपैकी तिसरे लहान मूल सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेली प्रतिबंधात्मक लस घेत आहे. कोरोना उद्रेकाची तीव्रता त्यांच्या लस उत्पादनामुळेच कमी करता आली. त्यामुळे त्यांच्या कार्याचे योगदान लक्षात घेता त्यांना केवळ पद्मभूषण पुरस्कारापुरते मर्यादित न ठेवता केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ने सन्मानित करावे,’’ असे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बुधवारी येथे सांगितले.

वनराई फाउंडेशनतर्फे पवार यांच्या हस्ते डॉ. पूनावाला यांना ‘स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, वनराईचे विश्वस्त गणपतराव पाटील, सचिव नीलेश खांडेकर, विश्वस्त रोहिदास मोरे, सचिव अमित वाडेकर उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘डॉ. मोहन धारिया यांनी राजकारण आणि समाजकारणाने देशाला वेगळी दिशा दाखवून दिली. राष्ट्र प्रथम ही मोहन धारिया यांची विचारसरणी होती. सिरम इन्स्टिट्यूट हे त्यांच्याच विचारांवर वाटचाल करून केवळ देशाचाच नव्हे तर जगातील प्रत्येकाचा विचार करून लस निर्मिती करत आहे.’’

डॉ. पूनावाला म्हणाले, ‘‘कपभर चहाच्या किमतीमध्ये लहान मुलांसाठी लस उपलब्ध करून देण्यात माझे कुटुंब आणि संस्थेचा मोठा वाटा आहे. तीन ते चाळीस वर्षांपूर्वी ही संस्था सुरू करताना त्यात डॉ. धारिया यांचे योगदान होते. त्यातून आज कोट्यवधी बालकांचे प्राण वाचत आहे, ही समाधानाची बाब आहे.’’

Pune
Rajya Sabha Election : संभाव्य निकालामुळे प्रफुल्ल पटेलांना उमेदवारी

चव्हाण म्हणाले, ‘‘आतापर्यंत हा पुरस्कार राष्ट्र निर्मात्यांना दिला आहे. डॉ. पूनावाला यांना हा पुरस्कार प्रदान केल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे. डॉ. धारिया यांनी वनराई संस्थेच्या माध्यमातून विकासाला दिशा दिली. त्याचप्रमाणे डॉक्टर सायरस पूनावाला यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेल्या कामामुळे केवळ देशालाच नव्हे तर जगाला मोठ्या संकटातून दूर केले आहे.’’ डॉ. वेद प्रकाश मिश्रा, डॉ. गिरीश गांधी यांनीही मनोगत व्यक्त केले. रवींद्र धारिया यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सतीश देसाई यांनी सूत्रसंचालन केले. रोहिदास मोरे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com