पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीस राहिलेला कालावधी विचारात घेऊन विकासकामे आचारसंहितेच्या प्रक्रियेत अडकून पडू नयेत, यासाठी राज्य शासनाने विकास कामांसाठीच्या टेंडर (निविदा) प्रक्रियेचा कालावधी कमी केला आहे. सर्व साधारणपणे १५ ते ४५ दिवसांचा निविदा भरण्यासाठी असलेला कालावधी आता ८ ते ३० दिवस इतका केला आहे.
पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे आचारसंहितेत विकासकामे करण्यास अडचण निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेऊन ई-निविदा प्रसिद्धीचा कालावधी कमी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने निविदा प्रक्रियेचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबतचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव दीपाली घोरपडे यांनी काढला आहे.
विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता घेणे, निविदा प्रसिद्ध करणे, वर्क ऑर्डर देणे, त्यानंतर प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात होते. यासाठी बराच कालावधी जातो. हे आर्थिक वर्ष संपण्यास दीड महिन्यांचा वेळ आहे. त्यामुळे वेळेत निधी खर्च करण्यासाठी, निवडणुकांच्या आधी विकासकामे सुरू करण्याचे शासनाचे नियोजन आहे.
टेंडरचा कालावधी कमी केला आहे, निवडणूकविषयक कामे, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यासंदर्भातील कामे व जनजाती क्षेत्रातील एक कोटीपर्यंतच्या कामांच्या निविदा प्रसिद्धीचा कालावधी तीन दिवस राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
नव्याने निश्चित करण्यात आलेला निविदांचा कालावधी...
कामाची किंमत कालावधी
१० लाख ते १.५ कोटी ८ दिवस
१.५ कोटी ते २५ कोटी १५ दिवस
२५ कोटी ते १०० कोटी २१ दिवस
१०० कोटींपेक्षा जास्त ३० दिवस
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.