तरुणाईचा बड्या कंपन्यांना टाटा!

उद्योजकतेकडे कल अधिक काळ; स्टार्टअपमध्ये देखील नोकरी करण्यास पसंती
startup
startup

पुणे : आर्थिक स्थैर्य आल्याने उद्योजकतेकडे वाढलेला कल, छोट्या कंपन्या किंवा स्टार्टअपमध्ये उपलब्ध होत असलेल्या चांगल्या पगाराच्या आणि उच्च पदाच्या नोकऱ्या आणि सध्या कार्यरत असलेल्या कंपनीकडून वाढत असलेल्या अपेक्षांची पूर्ती करण्यात होत असलेली दमछाक यामुळे बड्या कंपन्यांमधून नोकरी सोडून पर्याय शोधणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

कोरोनामुळे माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात निर्माण झालेल्या संधी आणि त्यातून सुरू होत असलेले स्टार्टअप यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. छोट्या कंपन्यांमधून नोकरी सोडत स्वतःचे काहीतरी सुरु करणाऱ्यांचे प्रमाण देखील यात मोठे आहे. परदेशातील कंपन्यांत वैयक्तिक पातळीवर प्रकल्प घेत काम करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. तप चांगल्या पगाराची अपेक्षा असलेले आयटीयन मात्र एका बड्या कंपनीतून दुसऱ्या बड्या कंपनीत जात आहे.

मिळून सुरू केले स्टार्टअप

एकाच कंपनीत अनेक वर्ष काम केलेल्यामुळे तेथील इतर सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण झालेले असतात. त्यातूनच काही सहकारी एकत्र येऊन स्टार्टअप सुरू करीत आहे. आयटीत वेगवेगळ्या बाबीत तज्ज्ञ असलेले मित्र यासाठी एकत्र येत आहेत. त्यामुळे एकाच वेळी ते कंपनीला रामराम ठोकून स्वतःचा व्यवसाय थाटत आहेत. एवढेच नाही तर चांगले काम करीत असलेल्या इतर सहकाऱ्यांना देखील ते नोकरीची संधी उपलब्ध करून देत असल्याचे देखील चित्र आहे.

नोकरी सोडण्याची प्रमुख कारणे

  • उद्योजकतेकडे वाढलेला कल

  • स्टार्टअपमध्ये उपलब्ध होत असलेल्या चांगल्या पगाराच्या आणि उच्च पदाच्या नोकऱ्या

  • कंपनीच्या वाढलेल्या अपेक्षांची पूर्ती करण्यात होत असलेली दमछाक

  • वर्क फार्म होम न देणे

छोट्या कंपन्यांना प्राधान्य

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार गेल्या एका वर्षांत टीसीएस ९२ हजार ६१८, इन्फोसिस ५८ हजार ६३२ आणि विप्रोमधून ५४ हजार ३५८ आयटीयन्सने नोकरी सोडली आहे. यातील अनेकांनी स्टार्टअप सुरू केले आहे तर काहींनी छोट्या कंपन्यांत जाण पसंत केले आहे.

नियम अधिक कडक

माहिती-तंत्रज्ञान आणि आधारित सेवा क्षेत्रात (आयटी, आयटीईएस, बीपीओ, केपीओ) कार्यरत कर्मचाऱ्यांकडून कंपनी सोडण्याचे प्रमाण (अॅट्रिशन रेट) वाढत असल्याने नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. तसेच नोकरी सोडण्याच्या तयारीत असलेल्यांना पॅकेज देखील वाढून देण्यात येत आहे. पगारवाढीही अनेक पर्याय कंपन्या अवलंबित आहे.

गेल्या १२ वर्षांपासून मी आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. या काळात आर्थिक स्थिती चांगली झाली असून त्याच बळावर स्टार्टअप सुरू केले आहे. त्यासाठी मी दोन महिन्यांपूर्वी नोकरी सोडली. चांगले प्रकल्प आणि त्यासाठी आवश्‍यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर स्वतःची कंपनी सुरू करण्याचा ट्रेंड आयटीमध्ये सध्या सुरू आहे. कोरोनामुळे याचे प्रमाण वाढले आहेत.

- आकाश त्रिभुवन, स्टार्टअपसाठी नोकरी सोडलेले आयटीयन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com