Pune News : नदी सुधार प्रकल्पाच्या कामामुळे पर्यावरणाची हानी - आदित्य ठाकरे

‘सजग पुणेकरांनी आवाज उठविल्याने वेताळ टेकडीवरील प्रकल्पाला स्थगिती मिळाली. नदी सुधार प्रकल्पाच्या कामामुळेही पर्यावरणाची हानी होत आहे.
Mula-Mutha-River
Mula-Mutha-Riversakal

पुणे - ‘सजग पुणेकरांनी आवाज उठविल्याने वेताळ टेकडीवरील प्रकल्पाला स्थगिती मिळाली. नदी सुधार प्रकल्पाच्या कामामुळेही पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामुळे अशा कामाविरुद्ध जनतेने आता आवाज उठवला पाहिजे. तरच सरकार आणि प्रशासन जागे होईल,’ असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले.

शहरातील विविध पर्यावरणप्रेमी संस्थांमार्फत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे आयोजित परिसंवादात ठाकरे बोलत होते. याप्रसंगी खासदार ॲड. वंदना चव्हाण, माजी आमदार मोहन जोशी, आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार, कॉम्रेड अजित अभ्यंकर, पर्यावरणप्रेमी सारंग यादवाडकर आदी उपस्थित होते.

पुण्यातील पर्यावरणाचा सर्वनाश करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, ‘प्रशासक कारभारामुळे राज्यातील परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. अधिकारी केवळ वरून आलेल्या आदेशांचे पालन करतात, सर्वसामान्यांना भेटत नाहीत. पुण्यात नदी सुधार प्रकल्पामुळे मुळा-मुठा नद्यांचे पात्र अरुंद होत आहे. त्यामुळे भविष्यात धोका निर्माण होणार आहे. हे काम गुजराती ठेकेदाराला देऊन गुजरातचेच भले केले आहे. मुळा-मुठा वाचविण्यासाठी मार्च महिन्यात जनता अदालत घेतली जाईल.’

ॲड. चव्हाण म्हणाल्या, ‘नदी सुधार प्रकल्पाला दोन वर्षांपूर्वी स्थगिती देण्यात आली होती. मात्र सरकार बदलले आणि त्यांनी पुन्हा काम सुरु केले. परंतु या प्रकल्पामध्ये अनेक चुकीची कामे केली जात आहेत. वारंवार विनंती करण्यात आली, तक्रारीही केल्या. परंतु महापालिकेचे प्रशासक त्याकडे दुर्लक्ष करत असून, आता प्रशासकालाच जाब विचारण्याची गरज आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com