.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे: ‘‘मराठा समाजासाठी मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदे यांनी जेवढे काम केले, ते महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही सरकारने केले नसावे. मराठा आरक्षण आणि समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये राज्य सरकारने कोणतीही कपात केलेली नसून, उलट त्या अधिक ताकदीने राबविल्या जात आहेत,’’ असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केला. तसेच शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.