सहकारी संस्थांकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन सदोष : शरद पवार

सहकारी संस्थांकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन सदोष : शरद पवार

उरुळी कांचन (पुणे) : विद्यमान राज्य सरकारचा सहकार चळवळ व सहकारी संस्थांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सदोष असल्याने राज्यातील अनेक चांगल्या सहकारी संस्था आज आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या आहेत. सहकारी चळवळ हीच राज्याच्या अर्थकारणाचा मजबूत कणा असल्याने, राज्य सरकारने आपल्या दृष्टीत बदल करावा, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उरुळी कांचन (ता. हवेली) येथे केले. 

उरुळी कांचन येथील डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेचा रौप्यमहोत्सव सांगता सोहळा माजी क्रेद्रिंय कृषीमंत्री शरद पवार प्रमुख उपस्थितीत उरुळी कांचन येथे शनिवारी पार पडला. यावेळी झालेल्या जाहीर कार्यक्रमात बोलतांना शरद पवार यांनी वरील आवाहन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे होते. 

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परीषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी अध्यक्ष प्रदीप कंद, 
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग थोरात, निसर्गोपचार ग्रामसुधार केंद्राचे विश्वस्त डॉ. एन. जी. हेगडे, उरुळी कांचन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानोबा कांचन, जिल्हा उपनिबंधक बी. टी. लावंड, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रा. के. डी. कांचन, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सचिव सोपान कांचन, विश्वस्त महादेव कांचन, देविदास भन्साळी यांच्यासह या कार्यक्रमाचे संयोजक व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन, उपाध्यक्ष रामदास चौधरी, मुख्यव्यवस्थापक लक्ष्मण वाल्हेकर, संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते. 

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यात सहकार चळवळ मोठ्या प्रमानात वाढल्याने, आर्थिकदृष्ट्रया ही दोन्ही राज्ये आजपर्यंत आघाडीवर राहिली आहेत. यशवंतराव चव्हाण, धनंजयराव गाडगीळ, वैकुठभाई मेहता यांच्यासारख्या लोकांनी तळागाळपर्यत सहकार पोहचवल्यानेच, ग्रामीण भागात सहकारी साखर कारखाने, दुधसंस्था, बॅंका, पतपेढ्या या सारख्या मोठमोठ्या सहकारी संस्था उभ्या राहिल्या व ग्रामिन भागाचा विकास झाला हे सत्य कोणालाही नाकारुन चालणार नाही. मात्र सध्याचे सत्ताधारी या सहकारी संस्थाकडे चमत्कारीक व दूषित नजरेने पाहत असल्याने आर्थिकदृष्ट्र्या संपन्न सहकारी संस्थाही अडचणीत येऊ लागल्या आहेत. या संस्था अडचणित आल्या तर सर्वसामान्य माणसे अडचणीत येणार आहेत. सरकारी बँका अथवा वित्तसंस्था सर्वसामान्य मानसाला आजही आपल्या वाटत नसल्याने, सर्वसामन्य माणूस पतसंस्था अथवा सहकारी संस्थाचा आधार घेताना दिसत आहे. चुकीचे काम करणाऱ्यांना सरकारने वटनीवर आनावे, मात्र चांहल्या संस्थांच्याकडे चांगल्याच नजरेने पहावे असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले. 

केंद्र सरकारवरही निशाणा..
दरम्यान केंद्र सरकारवर निशाना साधतांना शरद पवार म्हणाले, केंद्र सरकार सत्तेवर आल्यापासून आरबीआय, न्यायव्यवस्था अशा सर्वच स्वायत्त संस्थांच्यावर हल्ले 
चढवुन, संस्थांना खिळखिळ्या करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र ही बाब देशाच्या दृष्ट्रीने घातक आहे. काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली नोटबंदी केली. मात्र काळा पैसा बाहेर आलाच नाही हे खु्दद आरबीआयच्या अहवालात स्पष्ठ झाले आहे. दरम्यान सहकारी संस्थाच्या उत्पन्नावर संपुर्ण देशात प्राप्तिकर (इनकम टॅक्स) माफ असताना, पुणे जिल्हातील सहकारी संस्थांच्याकडुन वसुल केला जात असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. यासंदर्भात चालू अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com