पीकही गेले, मुलगाही गेला

shetkari
shetkari

टाकळी हाजी (पुणे) : गेल्या वर्षी दुष्काळाने ऊस जळाला, या वर्षी पावसाने शेतजमीन नापिक झाली. बॅंकांमधून काढलेल्या कर्जाचे व्याज वाढू लागले. याला कंटाळून शिरूर तालुक्‍यातील टाकळी हाजी साबळेवाडी येथील बाळू सुखदेव चाटे (वय 50) या शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
 
सुखदेव चाटे यांचे एकत्रित कुटुंब आहे. या कुटुंबाने शेती व्यवसायासाठी बॅंकेचे कर्ज काढले होते. गेल्या वर्षी दुष्काळ पडल्याने उसाचे क्षेत्र जळून गेले. त्यामुळे बॅंकेचे व्याज देखील भरता आले नाही. या वर्षी कांदा लागवड करून उत्पन्नात भर पडेल अशी आशा होती. मात्र, पावसाचा जोर वाढल्याने पिके पाण्यात गेली. त्यामुळे कर्जाला कंटाळून शनिवारी (ता. 2) रात्री साडेनऊच्या दरम्यान त्यांचा मुलगा बाळू चाटे याने विषारी औषध घेतले. त्यानंतर पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

गेल्या वर्षी पाऊस नसल्याने दुष्काळाचा सामना करावा लागला. तर या वर्षी ओला दुष्काळाचा अनुभव येऊ लागला आहे. कांद्याला बाजारभाव नसल्याने वडनेर (ता. शिरूर) येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर कर्जाला कंटाळून ही दुसरी आत्महत्या झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com