

सासवड शहर, ता. ८ : ‘‘शासनाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना आखल्या आहेत. प्रशासनाने पुरंदर तालुक्यातील पाणंद रस्त्यांची कामे विनातक्रार मार्गी लावून शेतकऱ्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी प्राधान्य द्यावे,’’ असे आवाहन पुणे विभागाचे उपायुक्त संजीव पलांडे यांनी केले.
सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृहात शुक्रवारी (ता. ८) ''छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा''चे आयोजन केले होते. नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिराचे उद्घाटन पलांडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, तहसीलदार विक्रम राजपूत आदी उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी टिळेकर यांनी सीलिंग जमिनींचे वर्गीकरण व नवीन शासन निर्णयांची माहिती दिली. सागर जगताप यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कैलास चव्हाण यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.