

Shirur Farmers Warn of Water Crisis, Intensify Protest Against Canal Lining
sakal
शिक्रापूर : ‘‘चासकमान कालव्याच्या अस्तरीकरणामुळे शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील भूजल पुनर्भरण पूर्णपणे थांबणार असून, येथील शेती, पिण्याचे पाणी आणि पर्यावरण धोक्यात येईल. प्रशासनाने स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हे काम रेटण्याचा प्रयत्न केल्यास संपूर्ण तालुक्यात तीव्र संघर्ष उभा केला जाईल,’’ असा इशारा देत पंचक्रोशीतील दहा गावांतील शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. ६) शिक्रापूर-पाबळ मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.