जिवाणूजन्य आजारांचा भविष्यात धोका (व्हिडिओ)

Sai-Kayrat
Sai-Kayrat

पुणे - माणसाच्या प्रगतीबरोबरच जिवाणू (बॅक्‍टेरियासुद्धा प्रगती करीत आहेत. बहुतेक आजारांना कारणीभूत जिवाणूंनी स्वतःला अद्ययावत केले आहे. आजारावर उपचार म्हणून देण्यात येणाऱ्या प्रतिजैवकांनाही (ॲन्टिबायोटिक) ते जुमानत नाहीत. त्यामुळे पुढील काही वर्षांत जिवाणूजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे, असा निष्कर्ष ‘शांतिस्वरूप भटनागर’ पुरस्कारविजेते जीवशास्त्रज्ञ डॉ. साई कृष्णन कायरात यांनी मांडला.

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयसर) संशोधन व ज्ञानदानाचे कार्य करणारे डॉ. कायरात सध्या जिवाणू आणि विषाणूंवर संशोधन करत आहेत. त्यांच्या या शोधाबद्दलच त्यांना भटनागर पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्याशी याच अनुषंगाने संवाद साधला असता त्यांनी ‘सकाळ’ला ही माहिती दिली. 

ते म्हणाल, ‘‘बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे रक्तातील साखरेचे आजार, कर्करोग, एड्‌स यांसारख्या आजारांवर आपण नियंत्रण मिळवत आहोत. पण, क्षयरोग, निमोनिया यांसारखे जिवाणूजन्य आजार आपले स्वरूप अद्ययावत करत आहेत.

त्यांच्यावर बहुउपचार पद्धतीचा अवलंब करावा लागेल.’’ देशात स्वच्छतेबद्दल वाढत चाललेली जागृती या आजारांना दूर ठेवण्यास मदत करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

जगभरामध्ये सध्या जिवाणूजन्य आजारांवर मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू आहे. देशातही वैद्यकीय संस्थांसह जीवशास्त्रातील मूलभूत संशोधन संस्थाही नवीन संशोधन करत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात अत्याधुनिक उपचारपद्धती विकसित करण्याचे काम चालू असून, त्यात देश म्हणून आपणही मागे नसल्याचा विश्‍वास डॉ. कायरात यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com